Pages

Sunday, July 10, 2011

आज, अभिमान बाळगावा? का? कशाचा?

मागे एकदा Dr. A. P. J. Abdul Kalam यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलं होत् की ‘भारतीय लोकांना आपल्या देशाप्रति जेवढा आपलेपणा, प्रेम आणि अभिमान असायला हवा तेवढा नाहीये’. इतकच नाही तर त्यांनी या करता काही उदाहरण देखील दिली होती ज्यात त्यांनी प्रेम, आपलेपणा आणि अभिमान जागरूक करण्याकरता काही मुद्दे मांडले होते. त्यातील एक मुद्दा असा होता की, सर्वात पहिले वर्तमानपत्रात पहिल्या पानावर कोणत्याही वाईट किंवा negative बातम्या छापणे थांबवावे.  Dr. Kalam असं म्हणतात की गेले अनेक वर्ष पाहिल्या पानावर चोऱ्या, खून, बलात्कार, अपघात, दारू पिऊन दंगा, लाच घेणे अश्याच बातम्या छापल्या जातात. या उलट मुद्दामून, ठरवून चांगल्या आणि positive बातम्या छापल्या तर लोकांमध्ये देशाबद्दल एक चांगुलपणा येईल. त्यांनी मांडलेला हा मुद्दा अगदी वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे बरेच लोक असे आहेत, ज्यांना मनापासून आपल्या देशा बद्दल प्रेम आणि अभिमान हा असतोच, पण कालांतराने त्यांना या गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे ती भावना जागरूक करायला, त्यांना सतत या ना त्या परीने जाणीव करून देणे हे गरजेचे आहे. अर्थात अशी भावना जागरूक करून द्यायला लागूच नये. पण काहीतरी चांगला होण्याकरता काही गोष्टी मुद्दामूनच सांगाव्या लागतात त्यातलाच हा एक भाग. सतत काहीतरी चांगलं वाचण्यात आणि ऐकण्यात येत आहे आणि ते ही आपल्या देशाबद्दल आहे, ह्यामुळे निदान काही टक्के लोकांचा दृष्टिकोन तरी बदलेल, अशी अपेक्षा करणं काही चुकीचं नाहीये.

पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर आज बोटावर मोजण्या इतक्या बातम्या असतील ज्या वाचून आपल्याला  आपल्या देशाबद्दल अभिमान वाटेल. त्यामुळे पहिल्या पानावर ठरवून सुद्धा सगळ्या positive बातम्या छापायच्या म्हटलं तरी छापता येणार नाहीत. नको त्या बातम्यांचं प्रमाण इतकं आहे की सगळ्या लोकांना ते पूर्णपणे कळणे हे देखील गरजेचे झाले आहे. लोकांना जर 2G घोटाळ्याबद्दल कळालचं नसतं तर कदाचित तो गैरव्यवहार अजूनही वाढला असता. तिकडे आदर्श घोटाळा बाहेर आला नसता तर तो लोकांना कळणार कसा? जेसिका लाल हत्याकांड, नितीश कटारा हत्याकांड, अगदी अलीकडील जन-लोकमत बिल आज जर लोकांपर्यंत पोचलं नसतं तर ह्या सगळ्यांना न्याय मिळाला असता का?

त्यामुळे आजच्या परिस्थितीसाठी Dr. Kalam यांनी मांडलेला हा मुद्दा थोडा बदलावा लागेल. वर्तमान पत्रात पहिल्या पानावर जरी काही वाईट किंवा negative बातम्या छापून येत असतील तरी त्यात काही गैर नाही. पण सगळ्या लोकांना, आपल्या देशात जे-जे काही वाईट आणि विचित्र कारभार चालू आहेत ते मात्र कळायलाच हवे. कदाचित त्यामुळेच लोकं जास्तं जागरूक होतील.

तुम्ही म्हणाल की त्या देशाबद्दलच्या अभिमानाचं काय? मी म्हणेन की अभिमान हा असा उगाचच येत नसतो किंवा मुद्दामून तयार नसतो करता येत. एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान वाटण्याकरता काहीतरी करावं किंवा घडवावं लागतं. अगदी छोटं उदाहरण आहे. आपण बघत असतो, वाचत असतो की तिकडे बाकीच्या पाश्चात्य देशात प्रगती इतकी मोठ्या प्रमाणात होत् आहे. 2G सोडा तिकडे आता 4G लोकांच्या दाराशी आलं आहे. आपल्याकडेही अशी नव-नवीन तंत्रज्ञान नक्की आमलात आणता येतील आणि आमलात येत देखील आहेत. आणि तसं जर होत असेल तर आपले लोकं Dr. Kalam म्हणतात त्या प्रमाणे पाश्चात्य देशांकडे नबघता आपल्याच देशाकडे अभिमानाने पाहतील. पण मग मला सांगा ज्या गोष्टीमुळे अभिमान वाढावा त्याचं गोष्टींमध्ये जर घोटाळे व्हायला लागले तर लोकांनी देशाबद्दल अभिमान वाटून घ्यावा का?

इजिप्त, बहारीन आणि लिबिया मध्ये चालू असलेल्या हुकुमशाहीला आपलं सरकार जाहीर पणे विरोध करत आहे. पण आपल्या देशात सुद्धा काही वेगळं चित्र आहे अशातला भाग नाहीये. आपण सगळे अगदी मान वर करून आपल्या सैन्याचा अभिमान बाळगतो. तिकडे सरकार सैन्यात भरती होण्याकरता खूप प्रमाणत प्रोत्साहन पण करत आहे. पण त्याच सैनिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये घोटाळे होत् आहेत. एवढाच नव्हे तर त्यांच्या करता तयार केल्या गेलेल्या शवपेटिका, यात सुद्धा गैर-व्यवहार झाले आहेत आणि गैर-व्यवहार करतात कोण तर हेच जे देश चालवत आहे. आपल्याकडे लोकशाहीच्या नावाखाली हुकुशाहीच चालू आहे असं म्हटलं तरी आज खोटं नाही ठरणार. जे राज्य करत आहेत तेच नियम बनवत आहेत, आणि जे घोटाळे करत आहेत तेच राज्य करत आहेत आणि त्यांची सावरा-सावरा करायला अजून वेगळे नियम-कायदे केले जात आहेत. ही अशी दुटप्पी भूमीका जर आपणच निवडून दिलेले ते राज्यकरते घेत असतील तर अभिमान येईलच कसा? स्वाभाविक पणे आपल्याच देशाबद्दल लोकांच्या मनात लाज आणि द्वेष निर्माण होण्याशिवाय राहणार नाही आणि त्यात काही गैरही नाही.

ह्यावर बरेच लोकं नेहमी म्हणतात “सामान्य माणसाने पाउल उचलायला हवं, त्याने अमुक करायला हवं, त्याने तमुक करायला हवं”. काहीही झालं की नेहमी सामान्य माणूस. अरे सामान्य माणूस का पाउल उचलेल? मी म्हणेन की सामान्य माणूस हा असाच असतो, तो सगळं चित्र उघड्या डोळ्याने बघत असतो, त्याची टीका करत असतो किंवा त्यांना बोटं दाखवत असतो कारण तो सामान्य माणूस आहे. त्याला त्या पुढे काही करता येत नसतं आणि आपल्या देशात हेच सत्य आहे. सामान्य माणसाला जगा समोर काहीतरी करून दाखवायला थोडं तरी पाठबळ लागतं जे खूप कमी लोकांना लाभतं. त्यामुळे सामान्य माणसाने काहीतरी करून दाखवावे ही अपेक्षाच चुकीची आहे.

पण हे ही इतकंच खरं आहे की एवढं सगळं असूनही मला आणि माझ्या सारख्या अनेकांना भारता बद्दल अभिमान आहे आणि तो नेहमीच असणार. ज्या लोकांना अभिमान नाहीय त्यांनी तो जागरूक करायला निदान एकदा एक प्रयत्न तरी करायला हवा. आपल्या देशा बद्दलचा अभिमान जागरूक करायला काही मोजकी लोकं आज आपल्याच समोर आहेत, त्यांच्याकडे बघा. Dr. Kalam, Dr. Prakash Amte अगदी साधी सोपं उदाहरण घ्यायचा झालं तर आपल्या देशाचं सैन्य, ज्यांना सगळी सत्य परिस्थिती माहित असून सुद्धा ते आपल्या देशाकरता रात्रंदिवस झटत आहेत. कसं आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपण जर चांगल्या बाजूला राहून, समोरच्या बाजूकडे एक बारीकसे लक्ष्य ठेवून, काय चांगलं आणि काय वाईट यातला फरक समजून घेतला तर कुठल्याही गोष्टींचे मोज-माप करायला सोपं जातं.

Practically बोलायचं झालं तर आज आपल्या मध्ये कोणी Bhagat Singh, Sukhdev किंवा Rajguru नाहीये आणि कोणी तसे तयार होतील असंही म्हणता येणार नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो तर जे-जे काही वाईट आहे त्याला वाईट म्हणणे. जे-जे चुकीचं आहे त्याला ठामपणे चूक म्हणणे. आप-आपल्या परीने जे चुकीचे आहे त्याचा विरोध करणे. तो विरोध ह्या अशा माध्यमातून व्यक्त करणे. चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखाबद्दल चा अभिमान टिकवून ठेवणे आणि एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगल्याची अपेक्षा करणे.

Tuesday, May 3, 2011

Mother Tongue चे आधुनिकीकरण.....



एक चित्र डोळ्या समोर आणा आणि मला सांगा की त्यातून तुम्हांला काय समजलं. चित्र असं आहे की सदाशिव पेठेत दोन मुली आपआपल्या गाड्यांवर बसून गप्पा मारत आहेत. एका मुलीचे नाव केतकी गोखले आणि दुसरी पूर्वा जोशी. अगं पूर्वे that day I was sitting in Vaishali आणि हा अमित suddenly walks in  म्हणजे एकदम असा माझ्या समोर येऊन उभा...I was की नाही so surprised you can’t even imagine गोखले बाई. “आई शप्पथ! then? I mean how was it…म्हणजे you would have been अगदीच हवेत ना?” जोशी काकू. Actually पूर्वे..actually…त्या Esquare च्या movie नंतर, I thought he would never ever meet me….but भारी ना!” गोखले बाई.

तुमच्या डोळ्या समोर जे चित्र उभं राहिलं त्यात तुम्ही, त्या मुली कशा असतील याचा विचार केला असेल हे नक्की.....साधारणपणे एक मुलगी कोथरूड सारख्या भागात राहणारी आणि दुसरी डेक्कन मध्ये राहणारी असेल. दोघेही अगदी चांगल्या मराठी कुटुंबात वाढलेल्या असणार, साधारण माध्यम वर्गीय. अगदी, मुलींचा चेहरा आणि त्यांचे एकंदर कपडे जर डोळ्या समोर आले असतील तर तुम्ही म्हणाल की एक फर्गुसनची असेल आणि दुसरी एस-पी किंवा गरवारेची. हे सगळं म्हणजे, एकंदर त्यांच्या बाह्य रूपावरून आणि बोलण्यावरून तुम्ही केलेले त्या दोन मुलीचं वर्णन. पण मला त्या मुलींच वर्णन किंवा त्याचं चरित्र-चित्रण अपेक्षित नाहीये. मला अपेक्षित आहे एक निष्कर्ष आणि तो निष्कर्ष असा आहे की “ हे आहे आजचं पुणं.”

असं म्हणतात की पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा म्हणजे अगदी खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा. वरील संभाषण ऐकल्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल की कधी-काळी पुण्यात बोलली जाणारी मराठी भाषा ही खरी, अस्सल, अचूक आणि एकदम शुद्ध मराठी भाषा होती. आज ती  मराठी नसून Minglish जास्त आहे आणि कारण तुमच्या समोरच आहे, वरील संभाषण.

आज पाहिलं गेलं तर दहा तरुण मुलं-मुलींपेकी किमान सात मुलं-मुली वरील संभाषण जसं आहे अगदी तशाच भाषेत बोलत असतात. त्यांच्या बोली भाषेत दर दोन मराठी शब्दानंतर चार-पाच English शब्द हे येतातच आणि महत्वाचं म्हणजे त्यात त्यांना काही गैर किंवा चूकही वाटत नसते. कारण: त्यांना त्याची सवयच झालेली असते. या सवयीचं मला उमगलेलं एक महत्त्वाचं कारण देखील आहे. हल्ली शाळेतून कॉलेजात गेल्यावर आपण खूप modern आहोत हे सगळ्या मुला-मुलींना (खास करून मुलींना)सगळ्यांना दाखवायचं हे असतंच. ह्या करता नुसतं पोशाक किंवा कॉलेज पूरक नसतं. त्यात भर पडते English बोलण्याची, English मालिका, सिनेमे बघण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे English गाणी ऐकून ती सतत पाठ करून म्हणत बसणे. आणि ह्या सगळ्याची सवय इतकी लागते की खरी किंवा शुद्ध मराठी भाषा काय असते हेच त्या मुला-मुलींना माहित नसतं.

याहून आश्चर्य वाटणारी बाब ही आहे की दररोज आपण हे असं चित्र बघत असतो पण तरीही कोणालाही काहीच खुपत नाही. अशा प्रकारे बोलल्या जाणऱ्या मराठीला सुधारण्यासाठी, कोणी काही करतही नाही. मुलं सर्रास आपआपसात या minglish मध्ये बोलत असतातच, पण स्वतःच्या घरी देखील ते आपआपल्या आई-वडलांशी याच Minglish मध्ये बोलत असतात. आणि आई-वडील देखील त्यांच्या मुलांच्या या अशा भाषेला विरोध करत नाहीत. आपली मुलं या आधुनिक जगात शिक्षित आणि प्रगत व्हावीत हे सगळ्या पालकांना सहाजिकच वाटत असतं. पण या नादात या आपल्या मराठी भाषे कडे खूप प्रमाणत दुर्लक्ष होत् आहे हे त्यांना जाणवत नाही हे बघून मला त्या पालकांची कीव येते. बर त्या मुलांना त्यांच्या या अशा बोलण्याबद्दल सांगायला गेलं तर आपणच वेडे ठरतो. “ अरे चालते रे, एवढा काही फरक पडत नाही आणि तसंही मराठीतून  बोललो काय आणि हे असं बोललो काय..end result एकच ना...मग chill….हे असं बोलणं आज-कालची पद्धत आहे रे “ असं उद्धट उत्तर आपल्याला ऐकावं लागतं.

आज ही परिस्थिती नुसत्या पुण्यातच आढळून येते असं नाहीये. सगळ्या मोठ्या शहरात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषेला एक दुय्यम स्थान मिळालं आहे जे अत्यंत लाजिरवाणी आहे. मला हेही तेवढंच पटत् की आजच्या जगात प्रत्येक माणसाला English मध्ये अगदी व्यवस्थित बोलता हे आलचं पाहिजे. ती आजची गरजही आहे आणि English ही जगाची भाषा आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आपण आपल्या मातृभाषेला English पेक्षा कमी लेखून अनादर करू नये, किंवा दुर्लक्षही करू नये. उगाच जगाला आपण किती प्रगत आहोत, किंवा किती “Modern” आहोत हे दाखवण्याकरता अशा Minglish भाषेत जर आपण बोलत असलो तर त्याला काही अर्थ नाहीये. तो निव्वळ वेगळं चेहरा चढवण्यासारखं किंवा मुद्दाम आव आणण्यासारखं आहे.

आज एखाद्या English medium मधील मुला-मुलीला त्यांची मातृभाषा काय आहे हे विचारा, उत्तर न मिळता एक प्रश्न तुम्हांला समोरून ऐकू येईल की “मातृभाषा म्हणजे काय?”....मग त्यांना विचार की “तुझी Mother tongue काय आहे?” आणि मग लगेच उत्तर मिळेल.

Thursday, January 13, 2011

ते smile

न्यूयॉर्क!
असं एक शहर...खरं तर याला शहर म्हणावं का जग हा मोठा प्रश्न आहे. जिथे वेळ, गती आणि पैसा, म्हणाल तर माणसाचे अगदी जिवलग मित्र, म्हणाल तर कट्टर शत्रू, असं हे जग. इथे कोणीही, कुठेही कोणासाठीही थांबत नाही किंवा थांबूच शकत नाही. सतत पुढे चालत रहायचं, अगदी पळायचंच. एखाद्याने ठरवून सुद्धा त्याला, इथे संथपणे जगता नाही येणार. असं म्हणतात की ‘the city that never sleeps’...खरंच इथला कण अन कण सतत जागा असल्या सारखाच असतो. निरनिराळ्या प्रकारचे, निरनिराळ्या देशातले लोक इथे राहतात आणि प्रत्येकातच एक प्रचंड उर्जा तुम्हाला जाणवत असते. 

एखाद्याला जे काही हवं आहे ते सगळं काही इथे आहे आणि त्यामुळे पहिल्या भेटीतच प्रेमात पडाव असं हे शहर. कॅलेजात असल्या पासूनच तो या न्यूयॉर्क च्या प्रेमात होता. आणि असं म्हणतात ना की तुम्हाला एखाद्याला भेटायची मनापासून खूप तीव्र इच्छा असेल तर ती इच्छा कधी ना कधी नक्की पूर्ण होते. त्याचा आत्मविश्वास म्हणा किंवा त्याची इच्छा, तो आज न्यूयॉर्क मध्ये येऊन अगदी समावून गेला आहे आणि आता त्या न्यूयॉर्क ने, तिथल्या लोकांनीही त्याला आपलंस केलं आहे.

पण कधी कधी त्याला असं वाटतं की इतक्या भल्या मोठ्या शहरात तो एखाद्या भूता सारखा एकटाच फिरतोय. आजूबाजूला मोठ–मोठ्या ईमारती असूनही त्याला बऱ्याच वेळा ते सगळं एका वाळवंटा सारखंच वाटतं. त्याच्या भवती सतत गर्दी असूनही त्याला ती गर्दी बऱ्याच वेळा जाणवत नाही. लोकांचा वावर, गाड्यांचे आवाज, सबवे चे हॉर्न, त्याला काहीही जाणवत नाही. पण नियमीतपणे तो दररोज त्याच रस्त्याहून, त्याच गर्दीतून त्याचा वेळी, त्याच सबवे मधून प्रवास करत आहे. आणि आता तो इतके वर्ष इथे आहे, त्याला बरेचसे रस्ते देखील माहित आहेत. पण हे सगळं असूनही तो त्या शहरात हरवल्या सारखा झाला आहे. तो सतत वाट शोधत भटकतोय. तो काही तरी शोधतोय. सतत शोधतोय. ट्रेन मध्ये शेजारी-पाजारी असणाऱ्या प्रत्येकाकडे बघून तो एक ओळखीचा चेहरा शोधायच्या प्रयत्नात असतो. बऱ्याच वेळा ही लोकं त्याच्याशी बोलतात, कधी-कधी बघून एक स्मितहास्यही देतात, पण त्याला कळतं आहे की हे सगळ खोटं आणि कृत्रिम आहे.

खरं सांगायचं झालं तर आता त्याला सगळं काही मिळालं आहे.....आणि सगळा काही मिळतही आहे. त्याने जे ठरवले देखील नाहीये ते देखील त्याच्या आयुष्यात चांगल्या परीने येत आहे. पण तरीही तो अजूनही स्वतःला पूर्ण मानत नाहीये. का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्यालाही माहित नाहीये. बहुतेक तो कुठल्याशा क्षणाची, कुठल्याशा गोष्टीची वाट बघतोय. पण तो क्षण कधी येणार आणि ती हवी ती गोष्ट कधी मिळणार हे ही त्याला माहित नाहीये आणि काळतही नाहीये. त्याला फक्तं इतकंच माहित आहे की काहीतरी कमी आहे आणि त्याच मुळे तो समाधानी नाहीये.

त्याच्या कडे सगळंकाही असूनही त्याला स्वतः भवती इतकी कसली कमी जाणवत आहे?

दररोज चा नाष्टा McDonalds च् बर्गर ने सुरु होतो आणि Starbucks च्या कॅफे लाटे ने संपतो. पण त्याला तो वडापाव आठवतोय. त्याला त्या टपरी वरच्या कटींग चा झुरका घ्यायचा आहे. एकीकडे David-off म्हणाल तर दुसरीकडे Marlboro, पण अजूनही त्या Classic Mild’s ने दिलेला शांतपणा, ते समाधान त्याला या सिगारेट मधून मिळत नाहीये. Jack Daniels, Absolute, Corona अगदी म्हणाल ती दारू त्याच्या हाताशी येईल, पण ती Old Monk दूर दूर पर्यंत त्याला दिसत नाहीये. त्याच्या शेजार-पाजारचे, त्याच्या ऑफिस मधले मित्र-मैत्रिणी, सगळ्यांच्यात तो अगदी मिळून-मिसळून असतो, पण त्यांच्यात तो खरा दोस्त किंवा जिगरी यार म्हणून कोणी शोधू शकत नाहीये. त्याला त्याचे नाना, कौसत्या आणि मोह्न्या हवे आहेत. घरात लॅपटोप, त्याच्या बेडरूमच्याभिंतीवर वर आई-बाबांचे, आजी-आजोबांचे फोटो आहेत, पण आता ते नुसते फोटो नसून त्यांची कमतरता त्याला जाणवायला लागली आहे.

तसं पाहिला गेलं तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण पूर्वी त्याचं आयुष्य यांच्यातच असायचं आणि याच गोष्टींमध्ये तो रमायचा. आणि नेमकं ह्याच सगळ्या छोट्या-छोट्या आत्ता त्याच्या बरोबर नाहीयेत आणि यांचीच कमतरता त्याला जाणवत आहे पण ते त्याच्या लक्षात येत नाहीये.

आजही तो एकटाच त्या Times Square च्या लखलखत्या प्रकाशात उभा आहे. आजही संपूर्ण शहर मोठ-मोठ्या नेओन लाईट्स, स्ट्रीट लाईट्स च्या प्रकाशात न्हाहून गेलं असूनही त्याच्या भवती त्याला नुसता अंधार जाणवत आहे.

एक माणूस येऊन त्याला फोटो काढायला सांगतो. तो माणूस, त्याची बायको आणि त्याची मुलं फोटो साठी उभे राहतात आणि हा ‘smile’ असं म्हणतो आणि फोटो काढतो.

त्याच्या आयुष्यात कमतरता आहे तर या एका ‘smile’ ची.




 

Monday, November 22, 2010

Guzaarish...

Sometimes it happens that Sachin shows his talent, his command over the game by just a mere 40 odd runs, you watch it and you feel what a cricketer he is. But at the same time the spectators sitting in the stadium may not feel the same, because they have come to watch Sachin play and he gets out by scoring that 40 odd runs. So for them it’s not a ‘Paisa Wasool’ innings. Today was the same case; just that here it wasn’t cricket. This was a film called Guzaarish. First of all let me clarify that I am not comparing Sachin to any film or its actors or directors. I am only citing an example of one being talented and genius and not getting his/her due for being that.

In a country like India where we refer the film industry as Bollywood (hilarious!!!) the main reason people (sorry public) watch a film is for the sake of entertainment. To be a successful and an audience’s film, it should have these ingredients; some masala( melodrama, larger than life characters) or some big stars or full on desi filmi hit music. The story, the performances, the direction and all the other relevant factors doesn’t really matter. And that’s why I greatly applaud the brave decision taken by Sanjay Leela Bhansali to make Guzaarish(and also Saawariya). You see the film and you can easily figure out that the Indian ‘public’ wouldn’t buy a ticket to watch this film. The simple reason being, no entertainment and no masala in it. And I guess Mr. Bhansali would also know this, so that is why I referred him as ‘brave’. Right from his first film Khamoshi to the current Guzaarish, you feel the artistic touch of Mr.Bhansali in his every film. In one of his interviews for Saawariya I remember him saying “I make films on the subjects which I feel, are good and not the subjects which the public feel would be good”. Black was a masterpiece, Saawariya was beautifully crafted and now Guzaarish is closer to Black.  I would say it’s not a film it’s a painting on a large canvas with multiple colors, multiple strokes gracefully embedded into it, and every color showing its presence and its feel. It is Mr. Bhansali’s art. Like Black it also goes beyond being than just a film. To comment on his direction is just getting some words together, constructing a sentence, putting it on paper and appreciating him. But no its beyond that and that can’t be expressed in words. When you see an artistic painting you not only appreciate the painter but there is a point where you are just into that painting. You are just deeply engrossed and observing the painting. Guzaarish was something like this.

The actors….I won’t call this as an act. Hrithik is presenting you exactly what Mr. Bhansali has in his mind. Hrithik’s eyes are the real actors in this film. They are lively, they show each and every emotion and they convey you the soul of Ethan. Akbar was a powerful role but Ethan is something beyond portraying the character. I would say the most prominent color which makes this painting an artistic masterpiece is Hrithik. Aishwarya excels though a not so big enough (in terms of the story) role for her. There is a different essence in their relationships which blends beautifully with the subject.  Rest all the actors have done their parts excellently.

The cinematography and the background score are like the garnishing agents which also add their value and make their presence feel. The lyrics are very poetic and apt.

Final word…there are some things which are to be applauded and appreciated. There is something beyond entertainment. Even though it won’t appeal to the masses but Mr. Bhansali,  and Hrithik, this film is for you and for you only. About the public…if they don’t like it, I pity them. For those who go with the masses I would still say ‘go and grab a seat and watch this magic, this mega painting and feel the emotions and be a part of the film’. Everything from acting, direction the story, dialogues, lyrics, the technicalities will make you involve in the film and you will feel as if you are also a part of them.

Bravo and cheers to Mr. Sanjay Leela Bhansali and Mr. Hrithik Rohsan.

Thursday, October 14, 2010

प्रिय पालक मंडळी....



‘पालक’.....पालक या शब्दाचा( खायचा पालक नव्हे!) उल्लेख झाला की मला माझी शाळाच आठवते. ह्याचं कारण असं आहे की, शाळेत कधीही वेडे-वाकडे वागलं, थोडी मस्ती केली, गृहपाठ केला नाही म्हणजे एकूणच काय आपण असं काही केलं जे आपल्या बाई-मास्तरांना आवडत नाही(आणि नेमकं तेच आपल्याला आवडते) आणि त्यांना हवं तसं आपण वागलो नाही की लगेच “उद्या पालकांना घेऊन यायचं बर का!”. त्यातून ही पालक मंडळी म्हटलं की त्यांचे एक-एक copyright dialogues देखील आठवतात. त्या dialogues चा भडीमार इतक्या वेळा होत् असे की dialogue सुरु झाला की दुसऱ्या सेकंदात आपणच तो dialogue पूर्ण करून टाकायचो(मनातल्या मनात).


पालकांचा आवडता शब्द किंवा सगळ्यात आवडणारी कृती कुठली तर ‘अभ्यास’.

“अरे अभ्यास कर, असा वेळ घालवू नकोस....आत्ता अभ्यास नाही केलास तर पुढे सगळा अंधार आहे”
त्यातून पुढचं म्हणजे...
“अभ्यास करायचा ठरवलं की कधीही, कसाही आणि कुठेही करता येतो. तुम्हांला सगळं हाताशी मिळत आहे ना, म्हणून तुम्ही हे असे दिवे लावताय....आमच्या काळी मुलं बेहर विजेच्या खांबाच्या खाली, रात्र-रात्र जागून अभ्यास करायचे.”

मला अगदी शंभर टक्के खात्री आहे की ही अशी वाक्य प्रत्येकाने किमान शंभरदा ऐकली असतील(आणि जर ऐकली नसतील तर आपल्यात काहीतरी fault आहे असं समजावं). त्यातून ही वाक्य ऐकायला येताच कुठेतरी लांब पळून जावसं वाटणे किंवा त्याच क्षणी कोणी तरी येऊन कानात earphones घालावे आणि जोरात rock music लावाव अस् वाटणे ह्यात काही दुमत नाही(नाही वाटले तर तुमच्यात खरंच काहीतरी fault आहे). निष्कर्ष काढायचा झाला तर असा काढता येईल की, शाळेपासून ते अगदी degree मिळेपर्यंत ‘अभ्यास’ हा एखाद्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे जो त्याने सतत जोपासला पाहिजे.

“तुम्ही शाळेत जाता ना? मग अभ्यास हा केलाच पाहिजे, पहिला नंबर आलाच पाहिजे”
अहो पण प्रत्येकाचा पहिला नंबर कसा येईल? या प्रश्नाचं देखील काही विद्वान आणि हुशार पालक हो न-यायला काय झालं आहे?...नीट अभ्यास केला की वाट्टेल ते होऊ शकते” असं उत्तर द्यायचे.

“तुझ्या वयाला हे असं बोलणं, असं वागणं अजिबात शोभत नाही” किंबहुना “माणसाने ज्या-त्या वयात त्या-त्या गोष्टी कराव्या” म्हणजे एकूणच तात्पर्य काय की काही गोष्टी, काही कृती या विशिष्ठ वयात करण्याकरता तयार केल्या गेल्या असतात. आणि हो, हा सर्व मान्य विचार, तत्वाद्यान(जे काही म्हणा!) आहे. “अहो पण काही गोष्टी त्या वयाकरताच असतात” असं चुकून जरी आपण म्हंटले की एक फटका बसलाच समजायचे. एवढच नव्हे पुढे पूर्ण रामायण ऐकायला लागतं. “अहो मुलं शाळेत आहेत, दंगा-मस्ती, खोड्या त्या-त्या वयात नाही केल्या तर काय म्हातारपणी करणार?”(असं मनातल्या मनातच म्हणायचं, नाहीतर चोप मिळतो)

अजून एक patent dialogue म्हणजे...
“हल्लीच्या मुलांना ना पैशाचं महत्वाचं नाहीये...मागितले की सगळं मिळत आहे ना, त्यामुळे ते जास्त शेफारले आहेत.” असं म्हटलं की झालं. आपण त्यांना समजवायचा प्रयत्न केला की “जास्त अगव्पणा करू नकोस, तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पहिले आहेत आम्ही”. म्हणजेच काय आपण काहीही बोललो, किंवा नाहीच, आपण काही बोलूच शकत नाही.

पालक अगदी टोकाची भूमिका घेण्यात पण पटाईत असतात, आणि खास करून आपल्या आया.
आज सहजंच मी एका ठिकाणी थांबलो होतो, तेंव्हा मला दोन-चार बायकांचं बोलणं ऐकू आलं(जेंव्हा बायका बोलत असतात तेंव्हा कान लाऊन ऐकावे, धमाल असते). “आमचा रोहन असा नाही हां! त्याचं time-table अगदी ठरलेलं असतं, आणि अभ्यास म्हटलं की अभ्यास. तो निखिलच मुळी जास्त आगाऊ आहे. स्वतः अभ्यास नाही करायचा आणि ह्यालाही नाही करून द्यायचा.” हे जर त्या रोहन ने ऐकलं ना तर तो बेशुद्ध होऊन पडायचा.
मला त्या बायका कोण होत्या किंवा तो रोहन कोण आहे  हे माहित नाही, पण अनुभवावरून सांगतो की, वास्तविक तो रोहनच असणार ज्याचं काही time-table नाहीये कारण time-table हे निखिलचंच असणार आणि तोच अभ्यासू असणार आणि रोहन जास्त आगाऊ असणार.

हे पालक लोकं असे का असतात हा प्रश्न माझ्या सारख्या अनेकांना पडत असेल कारण हा प्रश्न पडणे खूप स्वाभाविक आहे. पण खूप विचार करून मी एका निष्कर्षाला पोहोचलो आहे की, हा प्रश्नच चुकीचा आहे....पालक मंडळी ही अशीच असतात.

Saturday, September 18, 2010

पहिला पाउस!


सकाळी bus stop वर ती उभी होती आणि रस्त्याच्या पलीकडून मी तिच्याकडे बघत होतो. सकाळ पासूनच पावसाने थाट मांडला होता आणि इकडे माझ्या raincoat ने मला दगा दिला होता. पावसाने चिंब भिजलेला मी तसाच तिथे तिष्ठत तिच्याकडे बघत उभा होतो आणि आशा करत होतो की तिने नुसतं माझ्याकडे एकदा पहावे. जोरदार वाहणारा वारा, तो मुसळधार पाऊस, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, त्यांचे आवाज, तो उडणारा चिखल, सगळे माझं लक्ष्य विचलित करण्याच्या प्रयत्नात होते पण मी, मी मात्र त्या सगळ्यांवर मात करून तिच्याकडे बघत होतो. तिने माझ्याकडे पाहिले, पण...पाहून नापाहिल्या सारखे केले. मी तिथेच तसाच उभा होतो. मधूनच तिची नजर माझ्याकडे पडायची पण माझ्या डोळ्यांनी काही बोल्याच्याआतच ती नजर फिरवायची.

मी म्हणालो आता तरी बोल....

Bus समोर येऊन उभी होती आणि ती बस मध्ये चढली देखील होती. मी तिच्या खिडकी पाशी गेलो आणि तिला हाक मारली. एकदा मारली, दुसऱ्यांदाही मारली, bus मधील सगळ्या लोकांनी पाहिले पण तिने पाहिलं नाही.
मी म्हणालो आता तरी बोल....

Bus निघून गेली. मी तिला फोन केला पण तिने तो cut केला. मी पुन्हा एकदा प्रयत्न केला पण निकाल तोच फरक इतकाच, आता तिचा फोन वाजत राहिला. मी dialer tone बंद होई पर्यंत कानाला लाऊन ठेवला होता. मी म्हणालो आता तरी बोल पण शेवटी तो tone ही बंद झाला होता.
मागे वळलो आणि गाडी काढली आणि त्या traffic मध्ये माझीही भर पडली. चिखल, धूर सगळ्यांच्या मिश्रणातून माखलेला मी गाडी चालवत होतो. चालवत कसली रेटत होतो. Traffic मुळे वैतागलो होतो. त्यात रस्त्यातल्या खड्ड्यांनी आणि cycle वाल्यांनी अजून मनस्ताप दिला. तेवढ्यात एक गाडी शेजारून जोरात सगळे चीखलेचे पाणी उडवत गेली. माझा चेहरा, माझा पांढरा शर्ट सगळा चिखलमय झाला. आता मात्र राग, मनस्ताप, वैताग सगळं अगदी विकोपाला पोहोचलं होत्. शेजारच्या scooter वर बसलेली एक लहान मुलगी माझ्याकडे बघून अगदी दिल खुलास हसली. तिच्याही अंगावर ते चीखलेचे पाणी उडालेलं पण ते तिला आवडले होते. ती सारखा तिच्या डोक्यावरून रेनकोट काढत होती आणि तिची आई तो परत तिच्या डोक्य्वर घालत होती. ते पुढे निघून गेले. रस्त्याच्या पलीकडे साठलेल्या पाण्यात दोन-चार लहान मुलं मनसोप्त उद्या मारत होती आणि इकडे माझ्या चेहऱ्यावर वैतागाच्या आठ्यानी गर्दी केली होती.

मी कुठे जात होतो मला काही कळत नव्हते. ज्यावेळी लक्षात आले तोपर्यंत मी अगदी नदीवरचा पूल cross करून पुढे गेलो होतो. मी जरा भानावर यायचा प्रयत्न केला आणि गाडी परत मागे वळवली. तेवढ्यात मी एका माणसाला धडकलो. चूक माझीच होती म्हणून मी त्याला sorry म्हणणार तितक्यात तोच मला म्हणाला “माफ करा हां साहेब” आणि तो cross करून निघून गेला. त्याची बायकोही होती त्याच्या बरोबर. तिने cross करता करता त्याला विचारलं “लागलं नाय ना हो?”, त्याने नकारार्थी ,मान हलवली आणि ते पुढे चालत गेले. मी त्यांच्याकडे का कुणासठाऊक पाहताच होतो. दोघेही कदाचित मजूर होते, दोघांच्याही अंगावर ते भले मोठे निळे प्लास्टिक ओढले होते. चालत असताना त्याने तिच्या डोक्यावरचे प्लास्टिक व्यवस्थित adjust केले आणि ते दोघे पुढे निघून गेले. मी त्यांच्याकडे निर्विकारपणे बघत होतो. तेवढ्यात मागून गाडीवर एक मुलगी येऊन म्हणाली “हेलो ...रस्त्याच्या कडेला जा आणि मग हवा तितका विचार करा”. मी तिच्याकडे पहिले आणि ती हसत निघून गेली.

इकडे पावसाचा जोर वाढत चालला होता. गाडी चालवता चालवता गेल्या दोन-चार दिवसात मी असं काय केले होते ह्याचा विचार करत होतो. आज मी गाडी कमी चालवत होतो आणि विचार जास्त करत होतो. Crossing पाशी थांबलो, रस्त्यावरून रंगे-बिरंगी रेनकोट घातलेल्या शाळेतल्या मुलांचा ताफा जात होता. निर्-निराळ्या रंगांचे प्रदर्शन भरल्यासारखे ते दिसत होते. त्यातच दोन रेनकोट जरा उठून दिसत होते. दोन्ही एकसारखेच होते, भडक गुलाबी रंगाचे आणि त्यावर निळ्या रंगांची फुले होती. मी बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला. रेनकोट च्या आत सोन छोटे चेहरे मला दिसले, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांनी एकमेकांचे हात अगदी घट्ट ठरून ठेवले होते आणि त्या crossing वर मस्त रुबाबदार पणे चालत होते.

आज मला असचं का सगळं दिसत आहे? एवढा वैताग असूनही मन इतकं आनंदीही आहे आणि काहीतरी खुणवत पण आहे. गाडी सुरु केली आणि निघालो. मनातला विचार काही केल्या जाईना. एकदा परत तिला फोन करावासा वाटला पण आता माझा ego माझ्या आड आला. म्हटलं जाउदे, आता केला तर तीच करेल. असं म्हणे पर्यंत माझ्या शेजारून एक scooty गेली. एक क्षण मी त्या scooty वरून जाणाऱ्या मुली कडेच बघत होतो. ती मुलगी त्या पावसात बेधुंद होऊन गेली आहे. मागे बसलेले तिचे वडील सारखं तिला डोक्यावरून ओढणी घ्यायला लावत आहेत पण ती मुलगी तिच्याच विश्वात आहे. पावसामुळे, वाऱ्यामुळे ती ओढणी तिच्या डोक्यावरून घसरत आह, पण तिला ते कळत नाहीये. तिच्या लक्षातही येत नाहीये. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो पाऊस सुद्धा हुरळून जाईल, असं ते दृश्य होत्.

आता मात्र कहर होत् होता. हे असं सगळं मलाच का दिसत आहे? मला ते आता बघवत नव्हते. माझी ही अशी अवस्था, त्यातून बाहेर सगळे मनसोप्त बागडत आहेत. हे म्हणजे एखाद्याला मुद्दाम चिडवण्या सारखे होते. मी ठरवले, आता बास! कुठेही नबघता सरळ घराकडे गाडी वळवायची.

फोन वाजला....उत्कंठा वाध्लीवाध्ली...पण आईचा फोन होता. मी cut केला आणि निघत आहे तोपर्यंत कुठून तरी चहाचा मस्त वास आला. मी थांबलो. समोर एका झाडा खाली चाह्ची टपरी होती.गाडी लावतो तितक्यात “काय चाललाय तुझं?ती सिगारेट फेक हं” असं माझ्या कानावर आले. आवाजाच्या दिशेने मी पहिले. एक मुलगा आणि त्याची मैत्रीण असे दोघे त्या टपरी समोर उभे होते. मुलगा थंडी मुळे कुडकुडत होता. त्याच्या एका हातात छत्री होती आणि दुसऱ्या हातात सिगारेट. त्या मुलीच्या हातात गरम चहा, जो तिने रुमालात पकडला होता आणि त्याला तो पिण्याकरता ती अतोनात कष्ट करत होती. सिगारेट आणि चहाच्या वासात आता त्या ओल्या मातीचा सुगंध सुद्धा मिसळला होता. मला ते बघून अगदी तृप्त झाल्या सारखे वाटले...पण मनात काहीतरी खुणावत आहे. त्या दोघांकडून माझी काही नजर काही हलेना. माझा फोन वाजला, परत उत्कंठा वाढली, आता मात्र विकोपाला पोहोचली होती....कदाचित तिचा असेल...पण पाहिले तर आईचा होता. Cut केला आणि निघणार तेवढ्यात “अरे ये रे, काही नाही होत्” असं त्याच मुलीने म्हटलेले मला ऐकू आले. कुडकुडत असलेल्या त्या मुलाला ती मुलगी बाहेर पावसात बोलवत आहे, पण तो काही यायला तयार नाहीये. “ अरे ये रे...पहिला पाऊस आहे....पहिल्या पावसाचा आनंद काही वेगळाच असतो रे....परत परत हे असं अनुभवायला मिळणार नाहीय....ये रे लवकर” असं म्हणत त्या मुलीने त्याला ओढत पावसात भिजवलं. एखाद्या सिनेमात एखादा romantic scene आणि तोही slow motion मध्ये कसं दिसेल असं ते सगळे दिसत होतं. त्या मुलीने त्याचे हात ओढत त्याला टपरीच्या छपरा खालून बाहेर काढले आणि त्याच्या हातातली छत्री उडवून लावली आहे. ती छत्री अशी slow motion मध्ये खाली साठलेल्या पाण्यात पडली आहे. पडल्यावर त्या पाण्याचे काही थेंब हवेत उडून परत पाण्यात पडले आहेत. मागे background ला झाडावर आदळणारा तो पावसाचा आवाज आणि आता ते दोघे पावसात चिंब भिजून गेले आहेत.

इथे मला लक्षात आले की काल रात्री पासून पडत असलेला हा पाऊस या वर्षीचा पहिला पाऊस आहे. मला आता काही सुचेना. त्या दोघांना पाहून तिची आठवण आली. या क्षणी जर ती असती तर.....
मगाचपासून दिसणारी ही वेगवेगळी दृश्य आणि मला ते सगळं पाहिल्यानंतर आतून वाटणारी भावना नेमकी काय होती हे आत्ता मला कळत होत्. तो आनंद आणि ते खुणवत असलेले माझे मन नक्की काय होतं हे मला उमगले. हा पाऊस हळू हळू टप्प्या टप्प्यात सगळं काही सांगून गेला होता. पण मग मला जे वाटतं आहे ते तिलाही वाटत असेल का?

त्याच क्षणी मी फोन काढला आणि तिला फोन लावला. फोन engage होता. परत लावला पण पुन्हा engage. मला कळेना की एवढं काय झालं आहे. तेवढ्यात मला माझ्याच फोन वर missed call दिसला. तो मात्र तिचाच होतं आणि आत्ताचआला होता.तिला परत फोन लावणार तितक्यात sms आला. Sms तिचाच होता. “या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही निराळाच असतो हे माहित होत् मला....पण बरोबर आवडणारी व्यक्ती असेल तर अजून छान आणि निराळा होऊन जातो. वाग्ले. इतकं चिडायला नको होत् मी. सकाळी वागले त्या बद्दल sorry. संध्याकाळी भेटू....hope so पाऊस पडतच राहील आणि आपण या आपल्या दोघांच्या पहिल्या पावसाचा मनसोप्त आनंद घेऊ...bye TC”

Sunday, June 13, 2010

आजचं हे त्याचं पाचव पत्र होत्....

Baba gelyapasun, tasa mhatla tar saglya gharachi jababdari tyanchya bhavandanvarch hoti. Pan aamchya kakanna jababdari ya shabdacha artha na kadhi kalalay na kadhi kalel. Tyamule na saangta ti jababdari Dada var aleli hoti aani saglya lokanni te gruhitach dharlela. Dada cha vaay, to ti jabadari kinva ghar sambahlayla samartha aahe ka nahi, hyacha vichar na koni kela na konala karavasa vatla. Dada nuktach baravi jhalela hota aani tyala pudhe shikayachi ichcha hoti. Aamchya Aaila hey mahit hota aani tyachmule Dada la Punyat pathvaycha tine aadhich tharavlela hota. Saglyanchya virodh patkarat shewti Dada ekdacha Punyala shikayla gela khara, pan sagli jabadaari aata Aaiwar aleli hoti. Sheti, dhanya, dhanychi delivery hey sagla Aai ne swatahvar odhun gheun aamchya ghara karta khup motha tyaagach kela hota. 

Ikde aamche Kaku Kaku hey sagla tyanchya swatahcya dolyane baghta hote, pan Aaila madaticha haathbhar kadhich milala nahi. Gele don-teen varsha paaus neet na padlya mule peek neet yet navhta aani shetitun yenara utpanna kami hot chalalela. Ghar chalat hota te banket aslelya paishyanmule. Aai rab rab rabaychi, pan eka shabdane suddha kadhi konala kaahi mhanat nase. Tichi fakta ekacha ichcha hoti ki aaplya mulancha, aaplya gharacha sagla vyavasthit pane nibhavla gela paahije.

Dadavar ticha atonaat prem. Majhyawar hi tevdhach lala laavaychi ti, pan tya doghan madhla nata kahi veglach hota. Dada Punyat gelya pasun te nata ajun ghatta jhala hota. Tya doghat Aaicha, vadlancha, eka mitracha, eka mulacha, ek shikshakacha asa veg-vegli nati hoti. Punyat gelya pasun dar mahinyala Dada ek patra pathavat ase. Jya diwashi patra yenar tya diwashi Aai agdi khush ase. Tya diwashi tichya chehryawarcha anand kahi veglach asaycha. Tya patran madhe to itka kaay lihaycha hey aaj paryant konala kalalela nahiye. Patratla sagla majkur Aai saglyanna agdi anandane sangaychi pan te patra kadhich konala det nase. Aajahi ti patra Aaichya kholitlya konadyat vyvasthit aahet. 

Nantar pudhe Dadacha shikshan poorna jhala aani tyala changli nokri milali aani halu halu gharachya tya jabadarit to hi Aaichi madat karayla laagla. Dar mahinyala yenarya patra barobar aata money order hi yeu laaglya. Kalantarane Kaka Kakuncha tyachya baddal aslela mat achanak badalla. Tyanchya kadun Dadacha koutuk hou laagla. Char-choughat ugachach abhimanana Dada cha naav ghena, tyachi nako itaki stuti karma, hya aslya goshti hi vadhu laaglya. Thodkyat kaay tar gharat paisa parat yeu laagla aani aamche Kaka Kaku tya paishyane vahvat jau laagle. Pan eka vyaktichya swabhavat kadhich badal jhala nahi, ti mhanje aamchi Aai. Aai aajahi tikyach kashtane gharatlya saglya jabadarya ghetie. Tila Dadachya pragaticha khup anand hi aahe aani tyacha abhimaan hi vatato. Aajahi patra yenarya diwashi ti titkyat utsahat aste. Aapla mulga gharakarta paise pathavtoy, hya baddal tila abhimaan vataycha pan aajahi ti patra yenarya diwashi, postman kakankasun fakta patrach ghete. Money order kaka kinva kaku ghyayla jaat ase. 

Gharatla vatavaran aata khup changla jhalela hota. Aaicha taan kami jhalela hota. Ya warshi tasa paausahi bara padlyamule changlya peekacha yog hota. Ekandar aamhi sagle, mothe chote anandat nandat hoto. 

Rutu badala, diwas badalale aani te vatavaran hi badalala. Aaj aamcha vaada khup shant aahe. Baherchya bhintla khaplya padlya aahet. Chinmaynni maati ukrun ukrun bhintit khabdada padli aahet. To vishal aani tejasvi disnaara vada aata ekhadya padkya ghara saarkha distoy. Vadachya madhomadh asleli tulas poorna pane komejun gelie. Mi gele don-teen mahine darroj, vadya baher ubha rahaycho aani vadyakade baghat basaycho. Nantar nantar to vada, tyachi attachi dasha mala aksharsha baghwat navhti. Itka sagla hounahi Aai madhe mala kaahihi badal janvat navhta. Mi tichya kade baghat rahaycho. Niyamit pane pratyek mahinyat tya diwashi ti umbryat ubhi asaychi aani postman kaka yeun gele ki ti aat jaaychi.

Mala agdi kalenasa hoycha. Aai ashi ka vaagtie, tila sagla kalun nakalalya saarkha ti ka kartie, ha prashna mala saarkh pade. Kadhi kadhi vataycha ki ti sagli patra ughdun vaachun taakavi mhanje itka kaay aahe tya patrat nidaan te tari kalel. 

Aaj mi parat vadya samor ubha aahe. Aaj umbrya bhawati rangoli kaadhleli aahe. Umbrya pudhchi maati jarashi olsar aahe, ghar aani ghara samorcha aangan saaph kelelay. Majhya lakshat aala ki aaj ya mahinyatla patra yaycha diwas hota. Aai samor umbryat yeun ubhi raahili. Aaj mi Aaichya dolyatun hey sagla baghnyacha praytna kela. Mi baghtoe aani mala te baghvat nahiye.

Aai ajunahi tya umbryat ubhi hotich. Samorchya chowkatun cycle chya bell cha awaj kadachit tila aaiku yet hota. Sagla ghar nehmmi pramane anandamay houn gelela tila disat hota. Pora-baalanmadhla ek veglach utsah ti aajahi anubhavat hoti. Gharatle baakiche lok sutkecha nishwas gheun aap-aaplya kamala lagaleli tine baghitla. Aani tyachmule aajahi ticha chehra tevdhach prasanna hota. Postman kaka aalele hote, pan tyanchya kade aaj tyanchi pishwi navhti. Tynachya kade aaj ekach patra hota. Nehmi pramane te umbrya samor thamble, pan aaj tyanni na Aai kade baghitla na te hassle. Tynacha chehra nirvikar hota. Ekhadya yantra saarkha, tyanni nabaghta te patra Aaila dila aani te nighun gele. Nehmi pramane Aai te patra vaachtie, tyach anandat ti aat challie. Vatet asun naslelya tulashila ti namaskar kartie aani pudhe jaatie. Pudhe jaaun ti achanak thamblie aani Dadachya photo samor te patra tine thevlay. 

Aaj mi hey sagla baghu shaktoe, aaj mala hey sagla kalu shaktay karan aaj mi hey sagla eka Aaichya najrene paahtoy. Aaj mi tya Aaichya manala olakhu shaktoy, ji gele 4 mahine tyach anandat aani utsahat, tyach diwashi umbryat ubhi aste aani patrachi vaat baghat aste. Pratyakshat te postman kakahi yet nahit aani te patrahi yet nahi. Pan Aai la matra te patra nachukta miltay. 

Aajcha hey tyacha na alela paachva patra hota. Ajun kiti na aleli patra Aai ghenar aahe? Hya prashnacha uttar kadachit majha Dadach deu shakel......